Saturday, April 21, 2007

संवेदना...........

..... धी पावसाचि भुरभुर बघुन मन हुरहुरु लागयचे............. आता मात्र पावसाचा तिटकारा वाटतोय आधी सकाळी नजर दिवस चांगला जावा म्हणुन भारद्वाजाला शोधायचि.............. हल्ली बुद्धिने भावनेवर मात केलिये.......... आधि झाडाच्या पायथ्याच्या खारीची चाल बघुन मौज वटायची आताशा झाडंच दिसत नाहित चिमणी चिवचिवत नाही इंद्रधनु वेड लावत नाही असे कशामुळे होतय मन म्हातारे झालय? का वैश्विकरणामुळे संवेदना बोथट झालिये? लोकहो सगळ्यांचच असं होतंय का ? याचं उत्तर शोधत शोधत असच विमनस्कपणे एक दिवस भटकलो तेवढ्यात एक पांथस्थ दिसला.... विचारपुस केली त्याची कोण कुठचा म्हणुन.......... डोळेच त्याचे बोलुन गेले अमरत्वाचा वारसा सांगुन............... खिन्नपणाने हसला आणि म्हणाला ,
फ़िरतोय माथी एक शाप घेउन, कोवळ्या जिवांच्या हत्येचा हा परिपाक आहे. संवेदना गोठलेल्या मनाला मिळलेला अभिशाप आहे
मागत फ़िरतोय घडाभर तेल अश्वत्थामा करण्या पापाचे परिमार्जन जागत्या ठेवा संवेदना हाच त्याच्या जिवनाचा आशयघन .........

No comments: