Thursday, March 31, 2011

दे घुमा के

काल पाकिस्तानला हरवल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद जनमानसातुन उमटला तो बहुदा २६/११ च्या प्रकारानंतर प्रत्येक जण जो एक सुड घेउ इछित होता त्याचे प्रतिक असावे. मला कल्पना आहे कि या विधानाशी सगळेच सहमत होणारहि नाहित. पण लोकांच्या मताचे विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर त्याच्या मुळाशी हि भावना असावी असे वाटते. माझी वैयक्तिक भावना तरी ती होती.

तर आता पुढे जाउन शनिवारी भारत श्रीलंका यांच्यात अंतिम सामना आहे. अपेक्षांचे ओझे अर्थातच टिम इंडियावर असेलच. शुभेछ्या देणे आपले काम आहे . बाकी खेळणारे खेळतिलच !!

काहि वाचनिय

बरेच वर्षानंतर परततोय . विचार आहे कि य उपक्रमात तरि थोडिशी नियमिता ठेवावी. बघु कसे जमतंय ते. सध्य मि एक पुस्तक वाचुन संपवलं. डॉ सदनंद मोरे यानि लिहिलेलं "लोक्मान्य ते महात्मा".. अतिशय प्रचंड आवाक्याचा विषय अतिशय संतुलित स्वरुपात आणि तो हि कुठलाहि वाद निर्माण न होउ देता मांडलाय. नावातच स्पष्ट होत त्याप्रमाणे लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी ह नेतृत्व बदल आणि तत्कालिन परिस्थिती यावरिल भाष्य आहे. बराच मोठ आहे . दुसराही खंड वाचायला आवडेल . बर्‍याचशा घटना माहिती असलेल्यl असल्या तरिहि भाष्य दृष्टिने बघताना वेगळे वाटते.