Thursday, March 31, 2011

दे घुमा के

काल पाकिस्तानला हरवल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद जनमानसातुन उमटला तो बहुदा २६/११ च्या प्रकारानंतर प्रत्येक जण जो एक सुड घेउ इछित होता त्याचे प्रतिक असावे. मला कल्पना आहे कि या विधानाशी सगळेच सहमत होणारहि नाहित. पण लोकांच्या मताचे विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर त्याच्या मुळाशी हि भावना असावी असे वाटते. माझी वैयक्तिक भावना तरी ती होती.

तर आता पुढे जाउन शनिवारी भारत श्रीलंका यांच्यात अंतिम सामना आहे. अपेक्षांचे ओझे अर्थातच टिम इंडियावर असेलच. शुभेछ्या देणे आपले काम आहे . बाकी खेळणारे खेळतिलच !!

No comments: